रौप्य महोत्सव (silver jubilee - सिल्वर जुबली) म्हणजे २५ वा वर्धापन दिन होय. याला रजत जयंती किंवा पंचवीसवी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला २५ वर्ष पूर्ण झाल्यास रौप्य महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस २५ वर्ष पूर्ण झाल्यास रौप्य महोत्सव साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने १९७२ मध्ये स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा केला.
रौप्य महोत्सवी वर्ष हे २४ व्या वर्धापन दिनापासून ते २५ व्या वर्धापन दिनापर्यंत साजरे केले जाते.
सुवर्ण महोत्सव
सुवर्ण महोत्सव (Golden jubilee - गोल्डन जुबली) म्हणजे ५० वा वर्धापन दिन होय. याला सुवर्ण जयंती किंवा पन्नासवी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाल्यास सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ५० वर्ष पूर्ण झाल्यास सुवर्ण महोत्सव साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने १९९७ मध्ये स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला.
सुवर्ण महोत्सवी वर्ष हे ४९ व्या वर्धापन दिनापासून ते ५० व्या वर्धापन दिनापर्यंत साजरे केले जाते.
हीरक महोत्सव
हीरक महोत्सव (Diamond jubilee - डायमंड जुबली) म्हणजे ६० वा वर्धापन दिन होय. याला हीरक जयंती किंवा साठवी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ६० वर्ष पूर्ण झाल्यास हीरक महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ६० वर्ष पूर्ण झाल्यास हीरक महोत्सव साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने २००७ मध्ये स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव साजरा केला.
हीरक महोत्सवी वर्ष हे ५९ व्या वर्धापन दिनापासून ते ६० व्या वर्धापन दिनापर्यंत साजरे केले जाते. षष्ठी पूर्ती ६० वर्ष पूर्ण.
अमृत महोत्सव
अमृत महोत्सव (Platinum jubilee - प्लॅटीनम जुबली) म्हणजे ७५ वा वर्धापन दिन होय. याला अमृत जयंती किंवा पंताहत्तरावी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने २०२२ मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे.
अमृत महोत्सवी वर्ष हे ७४ व्या वर्धापन दिनापासून ते ७५ व्या वर्धापन दिनापर्यंत साजरे केले जाते.
शताब्दी
शताब्दी (Century - सेंचुरी) म्हणजे १०० वा वर्धापन दिन होय. याला शतक महोत्सव किंवा शंभरावी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला १०० वर्ष पूर्ण झाल्यास रौप्य महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस १०० वर्ष पूर्ण झाल्यास शताब्दी साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले, सन २०४७ मध्ये स्वातंत्र्याची शताब्दी साजरा करण्यात येईल.
शताब्दी वर्ष हे ९९ व्या वर्धापन दिनापासून ते १०० व्या वर्धापन दिनापर्यंत साजरे केले जाते.
विजयी विश्व तिरंगा प्यारा, झण्डा ऊँचा रहे हमारा। सदा शक्ति बरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, Post navigat वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा। झण्डा ऊँचा रहे हमारा। आओ प्यारे वीरों आओ, देश धरम पर बलि बलि जाओ, एक साथ सब मिल कर गाओ, प्यारा भारत देश हमारा। झण्डा ऊँचा रहे हमारा। शान न इसकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए सत्य की विजय कर दिखलाए, तब होवे प्रण पूर्ण हमारा। झण्डा ऊँचा र